तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ.आहेर व सरपंच सौ.नवले यांच्यामुळे गाव आजही पाणीदार.! नांदगाव-: संतोष कांदे यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने तालुका दुष्काळी घोषित झाला आहे,दुष्काळी उपाययोजना करण्याचे शासकीय पातळीवर अहवाल,निवेदने पोहचली आहेत,मात्र अशा परिस्थितीत याच तालुक्यातील चिंचविहीर गाव अपवाद ठरले आहे.या गावाने चक्क दुष्काळालाच चकवा दिला आहे. काही वर्षांपूर्वी न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा माजी महिला व बालकल्याण सदस्या सौ.सुनिता अनिल आहेर यांनी जिल्हा परिषदकडून प्राप्त निधीतून या गाव परिसरात एका छोट्या नाल्यावर एक सिमेंट प्लग बंधारा बांधला.त्यावर्षी झालेल्या पहिल्याच पावसाने हा बंधारा पूर्ण भरून गेला.आणि नंतरच्या काळात याच पाण्यावर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भक्कम सोय झाली. ही बाब हेरून सरपंच सौ.कविता सुरेश नवले यांनी मग चिंचविहीर चा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग नोंदवत गाव परिसरातल्या सर्वच छोट्या-मोठ्या नाल्यांवर जास्तीत जास्त सिमेंट प्लग बंधारे बांधून घेतले.आणि ह्या वर्षी जो का...