Posts

Showing posts from December, 2021

चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक-आ.सुहास कांदे

Image
नांदगाव-: समाजात वावरत असताना चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर वेळोवेळी पडणारी कौतुकाची थाप त्या व्यक्तीचा हुरूप वाढवतेच ; मात्र इतरांना ही चांगले काम करण्यास प्रेरणा देते,असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी केले.      स्व.गंगाधर (अण्णासाहेब) शिवराम आहेर शिक्षक पतसंस्थेच्या वतीने आयोजित नांदगाव रत्न व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी नांदगाव रत्न पुरस्काराने युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित सोनवणे व त्यांचे सहकारी तसेच शिक्षक गोरख जाधव यांचा आमदार श्री.कांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.     पुढे बोलताना आमदार कांदे यांनी शिक्षकांच्या ज्या समस्या या पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मांडल्या होत्या,त्यावर भाष्य करताना 'शिक्षकांनी ही कर्त्यव्याचे भान ठेवावे,मुख्यालयी राहणे ही गोष्ट अनेक अडचणीमुळे शक्य नसल्याची जाणीव मला आहे,मात्र वेळेत शाळेत पोहचून कामकाज करणे यात हयगय होता कामा नये,तसेच जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री व अन्य मंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी मी पूर्ण करेन,असा शब्द देतो...

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

Image
नांदगाव-: संतोष कांदे येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती अन नगरपालिका निवडणूका महाविकास आघाडी करून लढवल्या जातील,मात्र स्थानिक पातळीवर आमदार सुहास कांदे यांचा शब्द प्रमाण असेल अशी संदिग्ध भूमिका घेत शिवसेनेचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी भविष्यात तालुक्यातील राजकीय वाटचाल कशी असेल याचे थोडक्यात विवेचन केले आहे.      सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,मनमाड व नांदगाव नगरपालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि झालीच तर जिल्हा बँक अशा भरगच्च निवडणुका आहेत.आणि या निवडणुका दरम्यान एका दैनिकाने घेतलेल्या जनमत चाचणीत सेना,राष्ट्रवादी अन काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरच सत्ता मिळवणे शक्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे.आणि याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,व मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याने जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात जे भाष्य केले आहे,त्याला विशेष महत्व आहे.      सद्यस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषदचे चार गट व आठ गण आहेत.त्यात सेना-२,काँग्रेस-१,आणि भाजप-१ असे बलाबल आहे.तर पंच...